गुरुमाईंचे लेख लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
गुरुमाईंचे लेख लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

दशमहाविद्या कोण आहेत?

दशमहाविद्या – या नावातच सामावलेली आहे अपरंपार तांत्रिक रहस्यांची शक्तिपुंजं. "महाविद्या" म्हणजेच "महान विद्या", आणि "दश" म्हणजे दहा. या दहा तांत्रिक शक्ती म्हणजे स्वयं आदिशक्तीचे – परमेश्वरी ज्ञान, काळ, सृजन, संहार, मोह, वैराग्य, योग, मृत्यू, कल्याण अशा सर्व शक्तींचे विविध रूपे. या देवींची पूजा ही सामान्य भक्तीमार्ग नाही. ह्या कोणत्या भाविकांच्या 'आईच्या' किंवा 'हळव्या' भावना समजून घेणाऱ्या नाहीत. त्या क्रूर, कठोर आणि अतिशय शिस्तबद्ध आहेत. जशा नियमात पूजा झाली तर त्या कृपाही करतात, पण जर नियम मोडले, तर नाश अटळ आहे.

या महाविद्या आहेत: काली, तारा, षोडशी (त्रिपुरसुंदरी), भुवनेश्वरी, भैरवी, छिन्नमस्ता, धूमावती, बगलामुखी, मातंगी आणि कमला. या सर्वांचे मूळ स्वरूप वेगवेगळे असले, तरी त्यांचा मार्ग एकच – तंत्र. आणि तंत्र म्हणजे केवळ पूजाच नव्हे, तर एक अखंड साधना, जेथे नियम, निष्कलंकता, संयम, उपासनेचे सातत्य, वेळ, दिशा, भाव, आचार-विचार, शरीराची व मानसिक शुद्धता. या सगळ्यांचे काटेकोर पालन अनिवार्य आहे.

परंतु आजच्या काळात, विशेषतः गृहस्थ लोकांमध्ये एक मोठा गैरसमज निर्माण झाला आहे. तो म्हणजे “देव काही आपल्या चुका बघून माफ करत असतो”, “आईला मनापासून हाक मारली की ती धावते”, “आई रागवत नाही”, “आई सगळं समजून घेते” – हो, हे आपल्या कुलदेवी, ग्रामदेवी, कुटुंबातील परम स्नेहशील देवींबाबत योग्यही ठरू शकते. पण ‘दशमहाविद्या’ या त्या आई नव्हेत. त्या देवी आहेत, पण त्यांच्या ठिकाणी आईपणाचा ओलसर गोडवा फारसा नाही. त्यांचं आईपण म्हणजे तत्त्वज्ञान, शक्ती, निर्णय, संहार, आणि परत नव्याने निर्माण करणे.

या महाविद्यांच्या उपासनेत जर तुम्ही वेळ पाळला नाही, प्रायश्चित्त घेतलं नाही, यंत्रपूजा अर्धवट केली, प्राणप्रतिष्ठित मूर्तीला वेळेवर नैवेद्य, आवाहन, विसर्जन दिलं नाही, तर त्या शक्तीचा राग सौम्य नसतो. अनेक वेळा लोकांना वाटतं “माझ्या घरात कालीची मूर्ती आहे, मी तिला रोज फुल वाहतो, नमस्कार करतो. ती माझी आई आहे. ती रागावेल का माझ्यावर?” पण सत्य हे आहे की, तुमचं भाव कितीही प्रामाणिक असलं, तरी त्या देवी भावावर नव्हे तर विधीवर चालतात. विधी झाला, तर कृपा; विधी मोडला, तर नाश.

कालीची उपासना केली जाते मृत्युपर्यंतचा भय सोसण्यासाठी;

तारा – ज्याचे जन्म-मरणाच्या फेऱ्यातून मुक्त व्हायचं धाडस आहे त्याच्यासाठी;

षोडशी – राजस सौंदर्याच्या, त्रैलोक्य मोहाच्या अनुभवासाठी, जी ब्रह्मचर्य पाळणाऱ्या साधकासाठी आहे;

भैरवी – जी साधकाला पूर्णतः आपल्याच चर्म, रक्त, अस्थी, विकारातून पार उतरवते;

छिन्नमस्ता – जिची मूर्तीच स्वतःचे डोके कापलेली आहे आणि तरीही रक्त तीनजणींना पाजते;

धूमावती – विधवा, अस्थिरता आणि संपूर्ण वैराग्याची देवी;

बगलामुखी – शत्रुनाशासाठी वापरली जाणारी, पण ज्यात जर अंहकार आला, तर उलट स्वतःचाच नाश; मातंगी – पूर्णतः अपवित्र वाटणाऱ्या गोष्टींमधून दिव्यता शोधणारी;

आणि कमला – लक्ष्मीचे अत्यंत तांत्रिक रूप.

गृहस्थ व्यक्ती ह्या देवींची पूजा का करू नये?

कारण पहिलं म्हणजे – गृहस्थ जीवनच अशा तांत्रिक साधनेसाठी अडथळा आहे. सकाळी उठून ऑफिस, मुलांचं शाळेचं काम, घरची धावपळ, पती-पत्नीचं एकमेकांवर अवलंबून असणं, अनियमित जेवणं, कामाचा ताण, आणि मनात भिन्न भावनांची भरती-ओहोटी. यातून कोण घरात ठरलेली दिशा, ठरलेली वेळ, ठरलेलं आचरण, स्त्री-पुरुष स्पर्शवर्ज्यता, तांत्रिक ब्रह्मचर्य, मंत्रोपासनेतील अचूक उच्चार, नैमित्तिक पूजा, अन्ननियम, मौन, आणि तपश्चर्या याचे पालन करणार?

दुसरं म्हणजे – दशमहाविद्यांमधील काही देवींचे स्वरूप आणि उपासना ह्या अशा गोष्टी वापरतात ज्या सामान्य संस्कृतीत “अपवित्र” मानल्या जातात – जसं की छिन्नमस्ता साधनेत रक्त, धूमावती उपासनेत विधवा भोजन, मातंगी साधनेत अन्नाचं उष्टं, मृतदेहाजवळ पूजा, रात्रभर स्मशानात बसून साधना, इत्यादी. हे सर्व गोष्टी सामन्य गृहस्थ व्यक्तींच्या जीवनाशी आणि मानसिकतेशी पूर्णपणे विसंगत आहेत.

तीसरा मुद्दा – या देवी कुलदेवीसारख्या "माझ्या बाळाला मी माफ करीन", असं म्हणणाऱ्या नाहीत. उलट त्या फॉर्मूल्यासारख्या आहेत – 1 + 1 = 2. जसा चुकीचा नंबर डायल केला तर कॉल दुसऱ्यालाच लागतो, तसा चुकीचा विधी केला, अर्धवट केला, किंवा नियम न पाळता पूजा केली तर लाभ सोडाच, पण नुकसान निश्चितच. काही वेळा तर त्या देवींची शक्ती उलटून साधकावर परिणाम करत असते – घरात अघोरी घटक तयार होणे, मानसिक अस्थिरता, रात्रंदिवस स्वप्नात भीतीदायक दृश्ये, आर्थिक नुकसान, घरात अपघात, अचानक मृत्यू, घरात वाद, रोग, मुलांमध्ये चिडचिड, पती-पत्नीमध्ये वितुष्ट – हे सर्व अनुभव अनेक तथाकथित 'भाविक' किंवा 'स्वघोषित साधक' अनुभवल्याचे उघडपणे सांगितले गेले आहे.

लोक आज देवींच्या मूळ स्वरूपाकडे न बघता, सोशल मिडियावर एकमेकांचे व्हिडीओ बघून “माझं मन ओढलं जातं कालीकडे”, “तारामातेचा चेहरा खूप शांत वाटतो”, “छिन्नमस्तेच्या मूर्तीपुढे बसल्यावर खूप काही विचित्र अनुभवलं” – अशा भावनांवर आधारित अर्धवट श्रद्धा घेऊन या शक्तींकडे वळतात. पण भावनांवर देवी कृपा करत नाहीत. त्या तपावर, सच्च्या शुद्ध आचरणावर, आणि मंत्रसिद्ध साधनेवर कृपा करतात.

खरंतर या देवींचा मार्ग म्हणजे “नाश करून निर्माण” करणारा. तुझं संपूर्ण जुना स्वभाव, अहंकार, वासना, भीती, मोह, आसक्ती, राग – हे सर्व त्या आधी नष्ट करतात, त्यावर उलटतात, त्याला चिरडतात. त्यानंतरच त्या शक्ती प्रसन्न होतात.

म्हणून सामान्य गृहस्थाने या उपासनेकडे केवळ “आई” म्हणून बघू नये. त्या देवी आहेत – पण त्या आई नव्हेत, जशा आपणास वाटतात. त्यांच्या कृपेसाठी नियम हाच धर्म आहे.

गृहस्थाने आपली श्रद्धा आणि पूजाअर्चा आपल्या कुलदेवी, ग्रामदेवी, पारंपरिक देवतांमध्ये ठेवावी. त्या देवी भाव ग्रहण करतात, क्षमा करतात, वासनेतूनही भक्ती शोधतात, आणि खऱ्या अर्थाने “आई” असतात. पण दशमहाविद्या – त्या शक्ती आहेत. त्या प्रचंड, प्रखर, प्रखरापलीकडच्या... आणि त्यांच्याशी खेळ करणे म्हणजे स्वतःच्या आयुष्याशी खेळ.

शेवटी, उपासना हवीच – पण ती आपल्या क्षमतेप्रमाणे, आपल्या जीवनशैलीशी सुसंगत, आणि आपल्या संस्कारांशी एकरूप असली पाहिजे. श्रद्धेचा अर्थ अंधत्व नव्हे.ज्ञानपूर्वक मार्ग, नियमबद्ध साधना, आणि योग्य मार्गदर्शनाशिवाय दशमहाविद्यांच्या दिशेने पाऊल टाकणं – हे दिव्य नव्हे, ते धोकादायक आहे.

तेव्हा पूजेला भाव देताना, देवतेच्या स्वरूपाचं संपूर्ण ज्ञान आणि शिस्त हाच खरा श्रद्धेचा मार्ग आहे. अशा शिस्तबद्ध मार्गासाठीच दशमहाविद्या आहेत – ज्यांना पूजणं म्हणजे स्वतःच्या जीवनाच्या धमन्यांमध्ये अग्निशुद्धी घालणं. त्या कृपा करतात, पण भावावर नव्हे – नियमांवर.

अशाच अजून गूढ आणि रहस्यमयी माहितीसाठी आपला व्हाटसप्प ग्रुप जॉइन करा


या गोष्टी तुम्हाला कोणीही सांगणार नाही

दशमहाविद्या या खरोखरच गृहस्थ लोकांच्या मनोकामना पूर्ण करणाऱ्या आहेत का? तर याचे उत्तर आहे नाही. दसमहाविद्या म्हणजे अगदी मूलत: तंत्रशक्ती. लोकांना आता सगळं पटकन हवं असतं यूट्यूबवर एखाद्या मंत्राचा व्हिडीओ बघितला, पुस्तकात काही वाचलं आणि वाटलं की आपणही करू शकतो. पण ज्याला या शक्तींचं खरं स्वरूप समजतं त्याला ठाऊक असतं की या शक्ती “माते” असल्या तरी “दयामयी” स्वरूपात नव्हेत. त्या न्यायीही नाहीत, त्या केवळ शक्ती आहेत जशा विजेचा प्रवाह असतो. विजेला नाही विचार की समोरचा चांगला की वाईट. ती जशी आहे तशी परिणाम करते.

गृहस्थ लोकांनी दशमहाविद्या पूजनात शिरताना हे लक्षात ठेवणं फार आवश्यक आहे. कुलदेवी असो, तुळजाभवानी, साप्तशृंगी, रेनुका, महालक्ष्मी या सर्व दयामयी स्वरूपात येतात. त्या आपल्या भक्ताच्या भावनेवर द्रवतात. पण दशमहाविद्या या ज्या तंत्रशक्ती आहेत त्या भावनेवर नव्हे तर शक्तीवर चालतात. ज्याच्याकडे शक्ती आहे, ज्याच्यावर खऱ्या अर्थाने गुरुकृपा आहे, त्याचं त्या ऐकतात. गुरु म्हणजे येथे साधा पंडित नव्हे, किंवा फक्त देवमंदिरात पूजा करणारा ब्राह्मण नव्हे. येथे “तांत्रिक गुरु” अपेक्षित आहे जो स्वतः त्या मार्गावर पारंगत आहे, ज्याला मंत्राचा प्राणप्रत्यय आहे, आणि ज्याच्याकडे ते शक्तिसंपन्न हस्तांतर करण्याची क्षमता आहे.

दत्तगुरु, स्वामी समर्थ किंवा श्रीगुरुचरित्रातील गुरु या मार्गाचे आधारस्तंभ असले तरी, तांत्रिक मार्गात प्रत्यक्ष तांत्रिक गुरुंचं अस्तित्व अनिवार्य असतं. कारण ही साधना पंडितांच्या सहाय्याने होत नाही. पंडित फक्त विधी सांगतो, पण तंत्र हे विधीपेक्षा जास्त आहे. ही शक्तीची प्रयोगशाळा आहे. आणि ही प्रयोगशाळा चुकीने हाताळली तर स्फोट नक्कीच होतो.

ज्यांनी या साधना केल्या आहेत त्यांचे अनुभव अनेकदा फार भीषण असतात. काहींना मनावर परिणाम होतो, काहींच्या घरात कलह सुरू होतात, काहींच्या आयुष्यात आर्थिक संकटं येतात. कारण शक्ती हलवली जाते आणि ती नियंत्रणात नसेल तर उलटते. जसं तुम्ही वीजेचा तार हाताने पकडला, तर वीज विचारत नाही की तुम्ही भक्त आहात की चांगले माणूस. ती फक्त झटका देते. पण एखादा प्रशिक्षित इलेक्ट्रिशियन तोच तार हाताळतो तेव्हा काही होत नाही, कारण त्याला नियम कळलेले असतात.

आजकाल अनेक ठिकाणी ‘बगला मुखी दीक्षा’, ‘दशमहाविद्या दीक्षा’, ‘मंत्र दीक्षा’ अगदी सहज वाटल्या जातात. जणू एखादं प्रसाद वाटतोय. पण या मार्गात प्रसाद नव्हे तर प्राणदान दिलं जातं आणि जिथे प्राणांचा प्रश्न असतो तिथे खेळ चालत नाही. खरं ज्ञान असलेला गुरु कधीच गृहस्थांना सहजपणे अशा शक्ती देणार नाही. कारण त्याला ठाऊक असतं की जरा जरी चूक झाली तरी त्या शक्तीचा परिणाम गुरुवरही होतो.

काही लोक म्हणतात की आम्ही ब्राह्मणांकडून याचं अनुष्ठान करून घेतो. प्रश्न असा आहे की जेव्हा तो ब्राह्मण अनुष्ठान करेल, तेव्हा तो संकल्प कोणाच्या नावाने घेईल? तुमच्याच नावाने ना? मग फल तुम्हाला मिळावं म्हणून करेल. पण जर काही दोष बसला, तर तोही तुमच्याच नशिबी येणार. ब्राह्मण तर दक्षिणा घेऊन निघून जातील. पण परिणाम मात्र तुमच्या जीवनात उमटतील.

या सगळ्यात कुणाचाही विरोध नाही. पण विवेक असणं अत्यंत आवश्यक आहे. या शक्तींच्या मार्गात चालायचं ठरवताना स्वतःचा, कुटुंबाचा, घरचा विचार करावा. कारण ही साधना केवळ शक्ती देत नाही, ती परीक्षा घेते आणि अनेकदा फार कठोर परीक्षा घेते. ज्यांच्याकडे स्थिर बुद्धी, गुरुकृपा आणि आत्मबल आहे, त्यांच्यासाठीच हा मार्ग आहे. इतरांनी मात्र भावभक्तीचा, नामस्मरणाचा आणि कुलदेवी-दैवत पूजनाचा सोपा आणि सुरक्षित मार्ग निवडावा.

दशमहाविद्या या भीषण सत्य आहेत त्या साधनेचा खेळ नाहीत. त्या विद्यांचा अर्थच आहे “शक्तीचं तंत्र”. आणि शक्तीला फक्त भाव नाही, तर नियम असतात. म्हणूनच म्हणतात देवीची उपासना करा, पण शक्तीची परीक्षा कधीच घेऊ नका.




मी काय करू कुलदेवी उपासना? की दशमहाविद्या?

आज एक खूप महत्त्वाचा विषय तुमच्याशी बोलते आहे. कारण तुम्ही माझ्यावर प्रेम करता, विश्वास ठेवता…

पण काही वेळा अति श्रद्धेने, अति कुतूहलाने, चुकीच्या मार्गावर चालायला लागता… म्हणून आज मी स्पष्ट, अगदी ठाम शब्दांत सांगते कुलदेवी कोण? दशमहाविद्या कोण? आणि यात नेमकं काय अंतर आहे, ते समजून घ्या.


कोण असते कुलदेवी?

कुलदेवी म्हणजे आपल्या रक्तात, वंशात, परंपरेत खोलवर स्थिर झालेली, आपल्या जन्मोजन्मींच्या पूर्वजांनी उपासलेली, साक्षात आपल्या घरट्याची, आपल्या घराची, आपल्या अस्तित्वाची रक्षणकर्ती. कुलदेवी म्हणजे वात्सल्याचं, करुणेचं, रक्षणाचं, आशीर्वादाचं रूप. ती आईसारखी असते शांत, नितळ, सत्वगुणी. ती तुम्हाला मागे ठेवत नाही, ती पुढे नेत असते. ती तुम्हाला स्वप्नं देते, पण त्याचबरोबर त्यासाठी शुद्ध परिश्रमाची आणि योग्य मर्यादेची शिकवणही देते. आपल्या घरात आजी, आई, काकू, मावश्या, सगळ्यांनी एखाद्या देवीला नमस्कार करताना पाहिलं असेल, ती आपली कुलदेवी असते. तिच्या समोर दिवा लावला जातो, एक साधं पान सुपारी ठेवून नमस्कार केला जातो, आणि तरी तिचा परिणाम फार मोठा असतो. हीच देवी तुमच्या आयुष्यात जे जे अडथळे येतात, त्यांचं मूल कारण दूर करते. अंधश्रद्धा नाही, ही शक्ती आहे. श्रद्धा असेल, तर तिच्या छोट्याशा दर्शनातही तुमचं आयुष्य पालटू शकतं.

आता ह्याच्या विरुद्ध आहे दशमहाविद्या


दशमहाविद्या म्हणजे शक्तीच्या दहा महान आणि अत्यंत उग्र रूपांचा समूह. त्या आहेत — काली, तारा, षोडशी, भुवनेश्वरी,
भैरवी, छिन्नमस्ता, धूमावती, बगलामुखी, मातंगी आणि कमला. या प्रत्येक महाविद्या म्हणजे प्रत्येकीचा एक स्वतंत्र तांत्रिक मार्ग. यात सत्व नाही, यातील बहुतेक शक्ती राजस आणि तामस गुणांनी युक्त आहेत. त्या सृष्टीची रचना, विध्वंस, स्थिती आणि पुनर्निर्मिती करणाऱ्या आहेत. त्या म्हणजे तंत्रविद्येची परमसीमा.

मग तुम्ही विचाराल, माई, मग ह्या पूज्य आहेत का?

हो, त्या पूज्य आहेत… पण सर्वांसाठी नाहीत. महाविदयांच उग्र तत्त्व असतं, ते साक्षात शक्तीचं आदिम, अनावर रूप आहे. याला साधण्यासाठी एक अत्यंत कठीण, संयमित आणि तपश्चर्यायुक्त जीवन असावं लागतं. यासाठी ‘गुरु’ हवा पण कोणताही गुरु नाही, तर तंत्रसिद्ध गुरु. म्हणजे ज्याने स्वतः एक तरी महाविद्या सिद्ध केलेली असावी लागते.

पण आजच्या काळात सोशल मीडिया, यूट्युब, काही बोगस ग्रंथ विकणारे लोक, आणि ‘तांत्रिक’ नावाखाली स्वतःचं अघोरी आणि असामर्थ्याचं प्रदर्शन करणारे लोक यामुळे लोकांना वाटायला लागलंय की ही तंत्र साधना सर्वांसाठी खुले आहे. कुणीही कुठूनही ‘कुंजिका स्तोत्र’, ‘बगलामुखी स्तोत्र’, ‘काली मंत्र’, ‘भैरवी यंत्र’ करायला लागतात. बघा, ही फार मोठी चूक आहे.

ज्यांना गुरुदीक्षा नाही, जे गृहस्थ आहेत, ज्यांना कुठलाही योग्य तांत्रिक मार्गदर्शक नाही, त्यांच्यासाठी ही तंत्रमार्गाची पूजा अत्यंत हानिकारक आहे.

कारण तंत्रमार्गामध्ये अत्यंत गुप्त नियम असतात. हे यंत्र, मंत्र, स्तोत्र यांचे स्वतःचे जाग्रत क्षेत्र असते. त्या मंत्रांचं कंपन तुम्हाला वर नेऊ शकतं, पण ते तुमचं मन, देह, जीवन पूर्ण तयार नसेल तर तुम्हाला खाली फेकूनही देऊ शकतं. काही मंत्रांमध्ये त्यागाची, अपरिग्रहाची, एकांतिकतेची अपेक्षा असते. घरात संसार, मुलं, जबाबदाऱ्या असताना त्या साधना तुमच्यावर उलट परिणाम करू शकतात.

जसं काही औषधं डॉक्टरशिवाय घेतली, तर बऱं न होता अजून वाईट होतं, तसंच हे आहे. तंत्र हा आयुर्वेदासारखा आहे. योग्य निदान, योग्य संकल्प, योग्य गुरु, आणि योग्य सिद्धी. नाहीतर साधक वेडा होतो, शरीरात ताप चढतो, मनावर परिणाम होतो, आणि मग एकटेपणा, डिप्रेशन, भयानक स्वप्नं, चिडचिड, आर्थिक नुकसान, अपयश, आजार, कर्जं हे सगळं वाढतं.

तुम्ही म्हणाल पण माई, मंत्र तर देवीचा आहे… तो वाईट कसा होईल?

जसं अग्नि आहे, तो स्वयंपाकात वापरला तर पोषण करतो, पण अंगावर पडला तर जाळतो… तसंच मंत्राचं असतं. मंत्र हे ‘सजीव’ असतात. ते ओढतात… पण तुमच्या जीवनातील नकारात्मकता, असंतुलन, आणि विशेषतः अहंकार असेल तर ते त्याचं भक्ष करतात. तेव्हा हे लक्षात ठेवा तांत्रिक पूजा सर्वांसाठी नसते. ती केवळ सिद्ध गुरुच्या मार्गदर्शनातच होते. आणि ती साधना कुणीही घेत नसतो. ती देवी स्वतः तिचा योग्य साधक शोधून त्याला तिच्या साधना करवून घेते.

त्यामुळे, तुमच्यासाठी, आपल्यासाठी, समाजासाठी, आपल्या कुटुंबासाठी सगळ्यात प्रभावी आहे ती आपली कुलदेवीची उपासना.

कुलदेवी म्हणजे कोणताही तांत्रिक गुंता नाही, कोणतंही जोखमीचं साधन नाही. पण तरीही ती साक्षात जागृत असते. कारण आपल्या पूर्वजांनी ती जागवलेली असते. ती तुम्हाला आधीपासूनच ओळखते. तुम्ही तिच्यासाठी नवीन नाही, तिच्यासाठी परकं नाही. म्हणूनच कुलदेवीची एक साधी पूजा, एक जप, एक आर्त विनंती देखील तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडवू शकते.

तुम्ही दर सोमवारी, शुक्रवार, पौर्णिमा, अमावस्या यासारख्या दिवशी तिच्या नावाचा जप करा अगदी साध्या पद्धतीने. ओवाळा, दिवा लावा, तिला सांगितलं, "माझ्यावर लक्ष ठेव, आई…" एवढं पुरेसं आहे. कुलदेवी घर सांभाळते, नातं सांभाळते, पोट भरते, संकट टळवते, घरातले वाद शमवते, मूल जन्माला येण्यासाठी मार्ग करते… ही सगळीच ‘तांत्रिक’ कामं ती करत असते, पण एका सत्वगुणी, आपुलकीच्या मार्गानं.

तुमची कुलदेवी जागृत झाली, की बाकी कोणत्याही महाविद्येची गरज पडत नाही.

आणखी एक गोष्ट. मी काही वेळा पाहिलंय की ‘कुंजिका स्तोत्र’ म्हणायला सुरुवात केली की लोक म्हणतात "माझ्या घरात भांडणं वाढली." कारण ते स्तोत्र हनुमानाच्या, चंडीच्या आणि तांत्रिक भागाचे संमीलन आहे. हे नुसतं वाचायचं नसतं, त्यामागे विशिष्ट अधिकार, गुरूचं संरक्षण आणि सात्विक आचरण लागतं.

म्हणून मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगते गृहस्थ म्हणून, मुलाबाळांसह, संसार करत असाल…गुरुदीक्षा घेतलेली नसेल…तांत्रिक मार्ग समजलेला नसेल…तर कृपा करून अशा मंत्र, स्तोत्र, यंत्र, पूजांच्या वाटेला जाऊ नका. जगदंबा काही तुमच्यावर रागावत नाही. उलट ती म्हणते "बाळ, तू साध्या मनानं माझं नाव घे… मी तुला सगळं देईन."

ती तुम्हाला हव्या त्या गोष्टी देईल, पण तुमची परीक्षा घेणार नाही. दशमहाविद्या मात्र देण्याआधी तुमची प्रत्येक परीक्षा घेते. ती तुमच्या मनांची इच्छा पूर्ण करेल पण त्या आधी तुमच्या देहातून, मनातून, इंद्रियातून, सहनशक्तीतून तुम्हाला अगदी मरणासन्न करून सोडेल, वैरागी भाव आनेल, नाते संबंधी सगळे दूर होतील, जग नको नकोस वाटेल…तेव्हा तुम्हाला पाहिजे ते मिळेल कारण तिच्यासाठी तुम्ही हे सर्व सोडल्यानंतर, एकाकी झाल्यानंतर तिच्यासाठी पात्र बनता, आता तुम्हाला काय हवंय ते तुम्हीच ठरवा.

काही गोष्टी आहेत ज्या फक्त पाहण्यासाठी असतात जसं सूर्य… त्याचं तेज फक्त अनुभवण्यासाठी असतं, पाहण्यासाठी… हात लावला, की पोळतो. तसंच काही देवी रूपांचं आहे.

तर मग, हे लक्षात ठेवा —कुलदेवी ही तुमची खरी रक्षणकर्ती आहे.

तीच तुमचं उगमस्थान आहे, तुमचं अंतिम ठिकाणही. ती सत्वगुणी आहे, वात्सल्याने ओतप्रोत आहे. तिच्या उपासनेनं तुमच्या घरात चैतन्य, समाधान, स्थैर्य, यश, संतती, आरोग्य, आणि प्रसन्नता नांदते.ती सर्वात सुरक्षित, सर्वात प्रभावी, आणि सर्वात जवळची आहे.

बाकीचा तांत्रिक मार्ग तो दुर्मिळ लोकांचा, अगदी विशिष्ट मार्ग आहे. तो वाचनासाठी असू शकतो, कुतूहलासाठी असू शकतो… पण कृतीसाठी नव्हे.

शेवटी एवढंच तुम्ही शंभर देवता पुजलीत, तरी जर कुलदेवीला विसरलात, तर मूल जागृत होत नाही.

पण एकदा का कुलदेवी जागृत झाली, की ती तुमच्या संपूर्ण घराला, वंशाला, नातवंडांना देखील उजळवते.

म्हणूनच…कुलदेवीसारखी कुणी नाही…तीच खरी जगदंबा… तीच महाविद्या… तीच भक्तांची आणि उपासकांची पहिली आई!

जय जगदंब जय भवानी!

तुमचीच गुरुमाई









रहस्यमई गूढ दशमहाविद्या

दशमहाविद्या – या नावातच सामावलेली आहे अपरंपार तांत्रिक रहस्यांची शक्तिपुंजं. "महाविद्या" म्हणजेच "महान विद्या", आणि "दश" म्हणजे दहा. या दहा तांत्रिक शक्ती म्हणजे स्वयं आदिशक्तीचे – परमेश्वरी ज्ञान, काळ, सृजन, संहार, मोह, वैराग्य, योग, मृत्यू, कल्याण अशा सर्व शक्तींचे विविध रूपे. या देवींची पूजा ही सामान्य भक्तीमार्ग नाही. ह्या कोणत्या भाविकांच्या 'आईच्या' किंवा 'हळव्या' भावना समजून घेणाऱ्या नाहीत. त्या क्रूर, कठोर आणि अतिशय शिस्तबद्ध आहेत. जशा नियमात पूजा झाली तर त्या कृपाही करतात, पण जर नियम मोडले, तर नाश अटळ आहे.

या महाविद्या आहेत: काली, तारा, षोडशी (त्रिपुरसुंदरी), भुवनेश्वरी, भैरवी, छिन्नमस्ता, धूमावती, बगलामुखी, मातंगी आणि कमला. या सर्वांचे मूळ स्वरूप वेगवेगळे असले, तरी त्यांचा मार्ग एकच – तंत्र. आणि तंत्र म्हणजे केवळ पूजाच नव्हे, तर एक अखंड साधना, जेथे नियम, निष्कलंकता, संयम, उपासनेचे सातत्य, वेळ, दिशा, भाव, आचार-विचार, शरीराची व मानसिक शुद्धता. या सगळ्यांचे काटेकोर पालन अनिवार्य आहे.

परंतु आजच्या काळात, विशेषतः गृहस्थ लोकांमध्ये एक मोठा गैरसमज निर्माण झाला आहे. तो म्हणजे “देव काही आपल्या चुका बघून माफ करत असतो”, “आईला मनापासून हाक मारली की ती धावते”, “आई रागवत नाही”, “आई सगळं समजून घेते” – हो, हे आपल्या कुलदेवी, ग्रामदेवी, कुटुंबातील परम स्नेहशील देवींबाबत योग्यही ठरू शकते. पण ‘दशमहाविद्या’ या त्या आई नव्हेत. त्या देवी आहेत, पण त्यांच्या ठिकाणी आईपणाचा ओलसर गोडवा फारसा नाही. त्यांचं आईपण म्हणजे तत्त्वज्ञान, शक्ती, निर्णय, संहार, आणि परत नव्याने निर्माण करणे.

या महाविद्यांच्या उपासनेत जर तुम्ही वेळ पाळला नाही, प्रायश्चित्त घेतलं नाही, यंत्रपूजा अर्धवट केली, प्राणप्रतिष्ठित मूर्तीला वेळेवर नैवेद्य, आवाहन, विसर्जन दिलं नाही, तर त्या शक्तीचा राग सौम्य नसतो. अनेक वेळा लोकांना वाटतं “माझ्या घरात कालीची मूर्ती आहे, मी तिला रोज फुल वाहतो, नमस्कार करतो. ती माझी आई आहे. ती रागावेल का माझ्यावर?” पण सत्य हे आहे की, तुमचं भाव कितीही प्रामाणिक असलं, तरी त्या देवी भावावर नव्हे तर विधीवर चालतात. विधी झाला, तर कृपा; विधी मोडला, तर नाश.

कालीची उपासना केली जाते मृत्युपर्यंतचा भय सोसण्यासाठी;

तारा – ज्याचे जन्म-मरणाच्या फेऱ्यातून मुक्त व्हायचं धाडस आहे त्याच्यासाठी;

षोडशी – राजस सौंदर्याच्या, त्रैलोक्य मोहाच्या अनुभवासाठी, जी ब्रह्मचर्य पाळणाऱ्या साधकासाठी आहे;

भैरवी – जी साधकाला पूर्णतः आपल्याच चर्म, रक्त, अस्थी, विकारातून पार उतरवते;

छिन्नमस्ता – जिची मूर्तीच स्वतःचे डोके कापलेली आहे आणि तरीही रक्त तीनजणींना पाजते;

धूमावती – विधवा, अस्थिरता आणि संपूर्ण वैराग्याची देवी;

बगलामुखी – शत्रुनाशासाठी वापरली जाणारी, पण ज्यात जर अंहकार आला, तर उलट स्वतःचाच नाश; मातंगी – पूर्णतः अपवित्र वाटणाऱ्या गोष्टींमधून दिव्यता शोधणारी;

आणि कमला – लक्ष्मीचे अत्यंत तांत्रिक रूप.

गृहस्थ व्यक्ती ह्या देवींची पूजा का करू नये?

कारण पहिलं म्हणजे – गृहस्थ जीवनच अशा तांत्रिक साधनेसाठी अडथळा आहे. सकाळी उठून ऑफिस, मुलांचं शाळेचं काम, घरची धावपळ, पती-पत्नीचं एकमेकांवर अवलंबून असणं, अनियमित जेवणं, कामाचा ताण, आणि मनात भिन्न भावनांची भरती-ओहोटी. यातून कोण घरात ठरलेली दिशा, ठरलेली वेळ, ठरलेलं आचरण, स्त्री-पुरुष स्पर्शवर्ज्यता, तांत्रिक ब्रह्मचर्य, मंत्रोपासनेतील अचूक उच्चार, नैमित्तिक पूजा, अन्ननियम, मौन, आणि तपश्चर्या याचे पालन करणार?

दुसरं म्हणजे – दशमहाविद्यांमधील काही देवींचे स्वरूप आणि उपासना ह्या अशा गोष्टी वापरतात ज्या सामान्य संस्कृतीत “अपवित्र” मानल्या जातात – जसं की छिन्नमस्ता साधनेत रक्त, धूमावती उपासनेत विधवा भोजन, मातंगी साधनेत अन्नाचं उष्टं, मृतदेहाजवळ पूजा, रात्रभर स्मशानात बसून साधना, इत्यादी. हे सर्व गोष्टी सामन्य गृहस्थ व्यक्तींच्या जीवनाशी आणि मानसिकतेशी पूर्णपणे विसंगत आहेत.

तीसरा मुद्दा – या देवी कुलदेवीसारख्या "माझ्या बाळाला मी माफ करीन", असं म्हणणाऱ्या नाहीत. उलट त्या फॉर्मूल्यासारख्या आहेत – 1 + 1 = 2. जसा चुकीचा नंबर डायल केला तर कॉल दुसऱ्यालाच लागतो, तसा चुकीचा विधी केला, अर्धवट केला, किंवा नियम न पाळता पूजा केली तर लाभ सोडाच, पण नुकसान निश्चितच. काही वेळा तर त्या देवींची शक्ती उलटून साधकावर परिणाम करत असते – घरात अघोरी घटक तयार होणे, मानसिक अस्थिरता, रात्रंदिवस स्वप्नात भीतीदायक दृश्ये, आर्थिक नुकसान, घरात अपघात, अचानक मृत्यू, घरात वाद, रोग, मुलांमध्ये चिडचिड, पती-पत्नीमध्ये वितुष्ट – हे सर्व अनुभव अनेक तथाकथित 'भाविक' किंवा 'स्वघोषित साधक' अनुभवल्याचे उघडपणे सांगितले गेले आहे.

लोक आज देवींच्या मूळ स्वरूपाकडे न बघता, सोशल मिडियावर एकमेकांचे व्हिडीओ बघून “माझं मन ओढलं जातं कालीकडे”, “तारामातेचा चेहरा खूप शांत वाटतो”, “छिन्नमस्तेच्या मूर्तीपुढे बसल्यावर खूप काही विचित्र अनुभवलं” – अशा भावनांवर आधारित अर्धवट श्रद्धा घेऊन या शक्तींकडे वळतात. पण भावनांवर देवी कृपा करत नाहीत. त्या तपावर, सच्च्या शुद्ध आचरणावर, आणि मंत्रसिद्ध साधनेवर कृपा करतात.

खरंतर या देवींचा मार्ग म्हणजे “नाश करून निर्माण” करणारा. तुझं संपूर्ण जुना स्वभाव, अहंकार, वासना, भीती, मोह, आसक्ती, राग – हे सर्व त्या आधी नष्ट करतात, त्यावर उलटतात, त्याला चिरडतात. त्यानंतरच त्या शक्ती प्रसन्न होतात.

म्हणून सामान्य गृहस्थाने या उपासनेकडे केवळ “आई” म्हणून बघू नये. त्या देवी आहेत – पण त्या आई नव्हेत, जशा आपणास वाटतात. त्यांच्या कृपेसाठी नियम हाच धर्म आहे.

गृहस्थाने आपली श्रद्धा आणि पूजाअर्चा आपल्या कुलदेवी, ग्रामदेवी, पारंपरिक देवतांमध्ये ठेवावी. त्या देवी भाव ग्रहण करतात, क्षमा करतात, वासनेतूनही भक्ती शोधतात, आणि खऱ्या अर्थाने “आई” असतात. पण दशमहाविद्या – त्या शक्ती आहेत. त्या प्रचंड, प्रखर, प्रखरापलीकडच्या... आणि त्यांच्याशी खेळ करणे म्हणजे स्वतःच्या आयुष्याशी खेळ.

शेवटी, उपासना हवीच – पण ती आपल्या क्षमतेप्रमाणे, आपल्या जीवनशैलीशी सुसंगत, आणि आपल्या संस्कारांशी एकरूप असली पाहिजे. श्रद्धेचा अर्थ अंधत्व नव्हे.ज्ञानपूर्वक मार्ग, नियमबद्ध साधना, आणि योग्य मार्गदर्शनाशिवाय दशमहाविद्यांच्या दिशेने पाऊल टाकणं – हे दिव्य नव्हे, ते धोकादायक आहे.

तेव्हा पूजेला भाव देताना, देवतेच्या स्वरूपाचं संपूर्ण ज्ञान आणि शिस्त हाच खरा श्रद्धेचा मार्ग आहे. अशा शिस्तबद्ध मार्गासाठीच दशमहाविद्या आहेत – ज्यांना पूजणं म्हणजे स्वतःच्या जीवनाच्या धमन्यांमध्ये अग्निशुद्धी घालणं. त्या कृपा करतात, पण भावावर नव्हे – नियमांवर.

अशाच अजून गूढ आणि रहस्यमयी माहितीसाठी आपला व्हाटसप्प ग्रुप जॉइन करा

Latest Post

अप्सरा, यक्षिणी आणि योगिनी यांच्या बद्दल संपूर्ण माहिती

अनेक जण विचारतात की अप्सरा, यक्षिणी, किन्नरी, नागिणी किंवा अशा सूक्ष्म जगातील शक्तींची साधना करता येते का. पुस्तके वाचून, यूट्यूबवरील व्हिडि...