जप कोणत्या माळेने करावा?

भारतीय संस्कृतीत अनेक परंपरा, चालिरिती, मान्यता आहेत. आपल्या देशात शेकडो मंदिरे आहेत. विविध धर्म, जाती, पंथ एकत्रितपणे भारतात नांदतात. धर्म, विचार, पद्धती, चालिरिती, परंपरा वेगवेगळ्या असल्या, तरी एक गोष्ट समान आहे. ती म्हणजे नामस्मरण. ज्या व्यक्तीची देवावर श्रद्धा आहे, ती व्यक्ती भगवंतांचे नामस्मरण नेहमी करत असते. नामस्मरणात एक अफाट शक्ती आहे. देवाची साधना करण्याचा नामस्मरण एक मार्ग आहे. नामस्मरण हा उपासनेतील एक प्रकार आहे. नापजप हा कोणालाही हानिकारक नाही. नामजपाला वयाचे बंधन नसते. नामजप कुठेही करता येतो. त्याला खास विशिष्ट स्थळ हवे, असे काही नाही. शांत आणि एकांत जागा उपलब्ध असली तर, अधिक चांगले, पण ती उपलब्ध नसली तरी चालते. नामजपाला पहाटेच्या ब्रह्ममुहूर्ताच्या व संध्याकाळच्या गोरज मुहूर्ताच्या जवळपासची वेळ अधिक चांगली असते, अशी मान्यता आहे. नामजपासाठी सोवळे-ओवळे पाळायची आवश्यकता नाही. नामस्मरण करताना विविध माळांचा उपयोग केला जातो. नामस्मरण करताना कोणत्या माळा अधिक लाभदायक ठरू शकतात, जाणून घेऊया...

रुद्राक्ष माळ
नामस्मरण करताना विविध प्रकारच्या माळा आपण वापरतो. यामध्ये रुद्राक्षाच्या माळेचा वापर केला जातो. रुद्राक्षाचे अनेक प्रकार असतात. एकमुखी, पंचमुखी वगैरे. मात्र, नामस्मरण करताना साध्या रुद्राक्षांची माळ वापरली तरी चालते. गणपती, गायत्री देवी, दुर्गा देवी, महादेव शिवशंकर, कुमार कार्तिकेय आणि पार्वती देवीचे नामस्मरण वा जप करताना रुद्राक्षाची माळ वापरणे लाभदायक असते, असे मानले जाते. याशिवाय रुद्राक्षाची माळ गळ्यात घातल्याने हृदयरोग, रक्तदाब नियंत्रित राहतो. तसेच रुद्राक्षाच्या माळेत अकस्मात मृत्यू टाळण्याची मोठी ताकद असते, असेही सांगितले जाते. 

तुळशी माळ
नामस्मरण जेवढे जास्त करता येईल, तेवढे चांगले. ब्रह्मचैतन्य गोंदवलकर महाराज म्हणतात की, आंधळ्याने पाणी भरावे तसे नामस्मरण करावे. भांडे भरले किती आणि रिकामे किती हे त्याला समजत नाही, तो भरतच राहतो, तसे नाम सतत घेत राहावे. श्रीविष्णू, श्रीराम, श्रीकृष्ण, सूर्य नारायण यांचे नामस्मरण करण्यासाठी तुळशीची जपमाळ वापरावी, असे सांगितले जाते. वारकरी सांप्रदायात तुळशीच्या माळेला अनन्य साधारण महत्त्व आहे. बहुतांश वारकऱ्यांच्या गळ्यात तुळशीची माळ दिसते. तुळशीची माळ घातल्याने शरीर व मन शुद्ध करण्यासाठी तुळशीची माळ घालावी, अशी मान्यता आहे.

स्फटिक माळ
नामस्मरण करताना उच्चारापेक्षा नामाला अधिक महत्त्व असते. दुर्गा देवीच्या सर्व रुपांचे नामस्मरण करण्यासाठी स्फटिकांची माळ वापरावी, असे सांगितले जाते. देवीच्या नऊ स्वरुपांचा जप करतानाही ही माळ लाभदायक ठरते. याशिवाय लक्ष्मी देवी आणि सरस्वती देवीचे नामस्मरण करताना स्फटिकांची माळ वापरण्याचा सल्ला दिला जातो. तसेच स्फटिकांची माळ घातल्याने आर्थिक परिस्थिती सुधारते. रक्तासंबंधीचे आजार आणि रागावर नियंत्रण मिळवण्यासाठी स्फटिकांची माळ गळ्यात घातल्यास उपयोग होतो, अशी मान्यता आहे. 

शुभ्र चंदन माळ
नामस्मरण कुठेही करता येते. स्थळ-काळाच्या त्याला मर्यादा नाहीत. नामस्मरण करताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, ती म्हणजे नामजप करताना आपले मन पवित्र हवे; प्रसन्न हवे. नामस्मरणाला वा नामजपाला मर्यादा नाहीत. कोणत्याही देवतेच्या नामस्मरणासाठी शुभ्र चंदनाची माळ वापरली जाते. देवतांच्या पूजनावेळी चंदन वापरले जाते. वैज्ञानिकदृष्ट्या विचार केल्यास, शुभ्र चंदनाची माळ गळ्यात धारण केल्याने शरीर शुद्ध व ताजेतवाने होते आणि मनात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. 

लाल चंदन माळ
दुर्गा देवीचा नामजप करण्यासाठी रक्तचंदनाची माळ सर्वाधिक लाभदायक असल्याची मान्यता आहे. त्याचप्रमाणे रक्तचंदनाची माळ धारण केल्यास त्याचा उपयोग मधुमेह असणाऱ्या व्यक्तींना होतो, असे सांगितले जाते. करोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशवासीयांना घरात बसण्याचे आवाहन करण्यात आले आहे. घरात बसल्या बसल्या आपण नामस्मरण नक्कीच करू शकतो. नामस्मरणात एक अमोघ शक्ती आहे. भगवंतांचे नामस्मरण केल्याने नकारात्मकता जाऊन सकारात्मकता येऊ शकते. शिवाय वेळही चांगल्या कृतीत घालवल्याचे समाधान मिळेल. भारतीय संस्कृतीतील अनेक गोष्टी जगाने मान्य केल्या असून, अनेक कृती आचरणात आणल्या जात आहेत. आपणही नामस्मरण करून त्याला हातभार लावू शकतो. 

गोमुखी / जपमाळ बॅग
मंत्रजप/नामस्मरण करण्याचे साधारण नियम
मंत्रजप करण्यासाठी रुद्राक्षाची माळ असेल तर अधिक लाभ होतो; कारण शंकरांना रुद्राक्ष अतिप्रिय आहे. हि माळ सहजपणे उपलब्ध होते. हि माळ १०८ रुद्राक्षाची असल्यास अति उत्तम. यात एक सुमेरू (मेरुमणी) असतो. जेव्हा साधक मंत्रजप करतो तेव्हा सुमेरू आल्यावर माळ मागच्या दिशेला उलटवून पुन्हा मंत्रजप सुरु केले जाते. मेरुमणी ओलांडू नये हि काळजी मात्र घ्यावी लागते, अन्यथा दोष लागतो.
मंत्रजप करताना गोमुखी (कापडी पिशवी) वापरावी जेणेकरून मंत्रजप करताना कुणी पाहू नये
एका व्यक्तीने एकच जपमाळ वापरावी, दुसऱ्या व्यक्तीची माळ वापरू नये
मंत्रजप करताना मध्येच बोलू नये त्याने मंत्रजप खंडित होतो
जप पूर्ण झाल्यावर लगेच जागेवरून उठू नये. किमान ५-१० मिनिटे शांत बसावे
त्यानंतर शिवलिंगाला नमस्कार करून मगच आसन सोडावे

Group Join करा - https://chat.whatsapp.com/H3qxKhDzrGG6JfLVcp0GcN 


















































कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.

Latest Post

अत्यंत विशेष उपाय

वैयक्तिक सशुल्क मार्गदर्शन घेणाऱ्यांसाठी महाशक्तिपीठ तर्फे करण्यात येणारे उपाय हे सर्वसामान्य किंवा सार्वजनिक स्वरूपाचे नसून अत्यंत विशेष, भ...